शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

सातारी फेट्यात अमीरचे उद्गार, ‘लय भारी !’ अनपटवाडीत ग्रामस्थांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:34 IST

पिंपोडे बुद्रुक : सातारा जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेची कामे करताना गावकऱ्यांनी दाखविलेली एकी पाहून सातारी फेटा बांधलेल्या अभिनेता अमीर खानच्या तोंडून एकच डॉयलॉग बाहेर पडला, ‘लय भारी !’

ठळक मुद्दे डॉक्युमेंटरी चित्रीकरणाची लगबग : ; जलसंधारण कामांची केली पाहणी

पिंपोडे बुद्रुक : सातारा जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेची कामे करताना गावकऱ्यांनी दाखविलेली एकी पाहून सातारी फेटा बांधलेल्या अभिनेताअमीर खानच्या तोंडून एकच डॉयलॉग बाहेर पडला, ‘लय भारी !’.. कोरेगाव तालुक्यातील अनपटवाडी येथे डॉक्युमेंटरीच्या चित्रिकरणासाठी पत्नी किरण रावसह अमीर खान आले होते.तुफान आलंया,’ आता पाणी डोळ्यात नाही, तर गावात पाहिजे, त्यासाठी तुमची साथ हवी आहे,’ असे आवाहन ‘सत्यमेव जयते पाणी फांऊडेशन’चे अमीर खान यांनी केले. ‘सत्यमेव जयते’ राज्यात गेल्या तीन वर्षांपासून अमीर खान यांच्या ‘सत्यमेव जयते’ पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात या स्पर्धेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे झाली आहेत. पहिल्यावर्षी स्पर्धेत कोरेगाव तालुक्यातील वेळू गावाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता.

वॉटर कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ‘सत्यमेव जयते’ पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अनपटवाडी, (ता. कोरेगाव) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचे काम करून दुष्काळावर मात केली आहे. वॉटर कप स्पर्धेला सुरुवात होण्यास आणखी काही अवधी असताना अमीर खान जलसंधारणाच्या कामांची पाहणी व फाउंडेशनच्या कामांच्या डॉक्युमेंटरी चित्रीकरणासाठी अनपटवाडी, ता. कोरेगाव येथे आले होते.

त्यावेळी त्यांनी अनपटवाडीचे सरपंच मनोज अनपट व ग्रामस्थ यांच्याकडून जलसंधारणाच्या कामांची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, कोरेगाव प्रांत कीर्ती नलावडे, तहसीलदार स्मिता पवार, नायब तहसीलदार विठ्ठलराव पोळ व सरपंच मनोज अनपट आदी उपस्थित होते.दुष्काळावर मात करण्यासाठी आता युवकांनी पुढाकार घेण्याची गरज असून, युवकांनी ‘जलमित्रा’च्या भूमिकेतून श्रमदान अथवा आर्थिकदृष्ट्या सहकार्य करावे. असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.विद्यार्थ्यांना दिले पाणी बचतीचे धडेऔंध : खटाव तालुक्यातील जाखणगाव या गावास अभिनेता अमीर खान यांनी भेट देऊन ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना श्रमदानसह पाणी बचतीबााबत मार्गदर्शनही केले. ते म्हणाले, ‘श्रमदानाने अनेक गावे दुष्काळमुक्त झाली असून, आपल्या गावाची एकी महत्त्वाची ठरली आहे. ही एकी अशीच अबाधित ठेवावी.’ तसेच ‘आपण आई-वडिलांच्या जवळ हट्ट धरून डोंगरात जाऊन श्रमदान करावे,’ असे आवाहन जितेंद्र जोशी यांनी केले. यावेळी डॉ. अविनाश पोळ, गीतांजली कुलकर्णी, बाळासो शिंदे यांच्यासह ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या. 

‘पाणी फाउंडेशन’च्या वतीने लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे अनेक गावांची दुष्काळावर कायमस्वरुपी मात केली असून, यापुढे पाणीदार गाव म्हणून नावलौकिक मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.- मनोज अनपट,

सरपंच अनपटवाडी‘पाणी फाउंडेशन’ कार्याच्या चित्रीकरणासाठी ‘फाउंडेशन’चा सर्वेसर्वा अमीर खान याने आमच्या गावाची केलेली निवड हा ग्रामस्थांच्या कार्याचा गौरव आहे.-रामदास बोबडे,ग्रामस्थ अनपटवाडी.

टॅग्स :Aamir Khanआमिर खानSatara areaसातारा परिसरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा