शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

सातारी फेट्यात अमीरचे उद्गार, ‘लय भारी !’ अनपटवाडीत ग्रामस्थांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:34 IST

पिंपोडे बुद्रुक : सातारा जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेची कामे करताना गावकऱ्यांनी दाखविलेली एकी पाहून सातारी फेटा बांधलेल्या अभिनेता अमीर खानच्या तोंडून एकच डॉयलॉग बाहेर पडला, ‘लय भारी !’

ठळक मुद्दे डॉक्युमेंटरी चित्रीकरणाची लगबग : ; जलसंधारण कामांची केली पाहणी

पिंपोडे बुद्रुक : सातारा जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेची कामे करताना गावकऱ्यांनी दाखविलेली एकी पाहून सातारी फेटा बांधलेल्या अभिनेताअमीर खानच्या तोंडून एकच डॉयलॉग बाहेर पडला, ‘लय भारी !’.. कोरेगाव तालुक्यातील अनपटवाडी येथे डॉक्युमेंटरीच्या चित्रिकरणासाठी पत्नी किरण रावसह अमीर खान आले होते.तुफान आलंया,’ आता पाणी डोळ्यात नाही, तर गावात पाहिजे, त्यासाठी तुमची साथ हवी आहे,’ असे आवाहन ‘सत्यमेव जयते पाणी फांऊडेशन’चे अमीर खान यांनी केले. ‘सत्यमेव जयते’ राज्यात गेल्या तीन वर्षांपासून अमीर खान यांच्या ‘सत्यमेव जयते’ पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात या स्पर्धेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे झाली आहेत. पहिल्यावर्षी स्पर्धेत कोरेगाव तालुक्यातील वेळू गावाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता.

वॉटर कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ‘सत्यमेव जयते’ पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अनपटवाडी, (ता. कोरेगाव) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचे काम करून दुष्काळावर मात केली आहे. वॉटर कप स्पर्धेला सुरुवात होण्यास आणखी काही अवधी असताना अमीर खान जलसंधारणाच्या कामांची पाहणी व फाउंडेशनच्या कामांच्या डॉक्युमेंटरी चित्रीकरणासाठी अनपटवाडी, ता. कोरेगाव येथे आले होते.

त्यावेळी त्यांनी अनपटवाडीचे सरपंच मनोज अनपट व ग्रामस्थ यांच्याकडून जलसंधारणाच्या कामांची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, कोरेगाव प्रांत कीर्ती नलावडे, तहसीलदार स्मिता पवार, नायब तहसीलदार विठ्ठलराव पोळ व सरपंच मनोज अनपट आदी उपस्थित होते.दुष्काळावर मात करण्यासाठी आता युवकांनी पुढाकार घेण्याची गरज असून, युवकांनी ‘जलमित्रा’च्या भूमिकेतून श्रमदान अथवा आर्थिकदृष्ट्या सहकार्य करावे. असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.विद्यार्थ्यांना दिले पाणी बचतीचे धडेऔंध : खटाव तालुक्यातील जाखणगाव या गावास अभिनेता अमीर खान यांनी भेट देऊन ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना श्रमदानसह पाणी बचतीबााबत मार्गदर्शनही केले. ते म्हणाले, ‘श्रमदानाने अनेक गावे दुष्काळमुक्त झाली असून, आपल्या गावाची एकी महत्त्वाची ठरली आहे. ही एकी अशीच अबाधित ठेवावी.’ तसेच ‘आपण आई-वडिलांच्या जवळ हट्ट धरून डोंगरात जाऊन श्रमदान करावे,’ असे आवाहन जितेंद्र जोशी यांनी केले. यावेळी डॉ. अविनाश पोळ, गीतांजली कुलकर्णी, बाळासो शिंदे यांच्यासह ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या. 

‘पाणी फाउंडेशन’च्या वतीने लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे अनेक गावांची दुष्काळावर कायमस्वरुपी मात केली असून, यापुढे पाणीदार गाव म्हणून नावलौकिक मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.- मनोज अनपट,

सरपंच अनपटवाडी‘पाणी फाउंडेशन’ कार्याच्या चित्रीकरणासाठी ‘फाउंडेशन’चा सर्वेसर्वा अमीर खान याने आमच्या गावाची केलेली निवड हा ग्रामस्थांच्या कार्याचा गौरव आहे.-रामदास बोबडे,ग्रामस्थ अनपटवाडी.

टॅग्स :Aamir Khanआमिर खानSatara areaसातारा परिसरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा